राज्य वक्फ बोर्ड औरंगाबादमध्ये फी भरण्यासाठी बँकेच्या डिमांड ड्राफ्टची अनावश्यक गरज .. डीडी उपलब्धतेत अडचणी .. बोर्डामध्येच कॅश काउंटर उघडण्याची मागणी …
लातूर (मोहम्मद मुस्लिम कबीर) महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड आपल्या कुटिलपणा आणि कपटपणासाठी ओळखला जातो. याचिकाकर्त्याने त्याच्या अर्जावर काय कारवाई झाली आहे याची तपासणी करण्यासाठी बोर्डाच्या कार्यालयात जाई पर्यंत तेथून कोणताही पत्रव्यवहार होत नाही. यासाठी एकतर कर्मचार्यांची कमतरता निमित्त म्हणून वापरली जाते किंवा "गरज असेल तर इथे यायलाच हवं" असं म्हणत टाळला जातो. आणि जिल्हा वक्फ कार्यालयात विचारणा केली तर काम औरंगाबादहून होत नाही आम्ही काय करावे हे सांगून स्वतःचा मार्ग स्वीकारतो. पवनचक्की औरंगाबाद च्या चक्कर मारल्या शिवाय मुख्य कार्यालयातून कोणताही फोन किंवा पत्रव्यवहार होत नाही. त्यामुळे राज्यभरातील अर्जदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मग अशा परिस्थितीत राज्य वक्फ मंडळाच्या अकाउंटंट द्वारे आणखी एक समस्या उद्भवली आहे की विविध कामांसाठी विहित फी भरणे करिता केवळ बँक डिमांड ड्राफ्टद्वारेच स्वीकारले जाईल. यासंदर्भात ते म्हणाले की, हे आदेश मंडळाचे वरिष्ठ अधिकारी अनिस शेख यांनी दिले आहेत. आता येथे एक मोठी समस्या अशी आहे की दुर्गम भागातील अर्जदार (ज्यांना प्रथम फी माहित नसते, कोणत्या कामासाठी किती फी आवश्यक आहे) डीडी मिळविण्यासाठी बँकेत पोचतात, त्यानंतर बँकेला डीडी द्यावा लागतो. डीडी त्वरित उपलब्ध होऊ शकत नाही. कारण बँकानी आपले नियम बदलल्याने डी डी मिळणे जिकरीचे झाले आहे अशा परस्थितीत, अर्जदारांना दोन दिवस आपले मुक्काम औरंगाबादला करावे लागत आहे आणि अर्जदाराची आर्थिक परिस्थिती काय आहे हे माहित नसलेले असहाय्य आणि मजबुरीने मुक्काम करावा लागत आहे, तेथे जबाबदार लोक असतील तर त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागेल.
वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनीस शेख यांनी वक्फ बोर्डामध्येच कॅश काउंटर सुरू करावे आणि फीची रक्कम स्वीकारावी व लोकांना त्रास देऊ नये अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. या प्रस्तावावर त्वरित विचार केला पाहिजे.
Md.Muslim Kabir,
Latur Distt. Reporter
09175978903/8208435414
