सांगली | राज्य सध्या भीषण दुष्काळाच्या छायेत आहे. या पार्श्वभूमीवर ३१ ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर करणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. ते सांगलीच्या जतमध्ये बोलत होते.ज्या तालुक्यांमध्ये ३१ टक्के पेक्षा जास्त दुष्काळ आहे त्याच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. महाराष्ट्रात असे १७२ तालुके असल्याचं ते म्हणाले आहेत. ज्या भागात दुष्काळ जाहीर केला जाईल त्या भागांना सवलतीही जाहीर केल्या जातील, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगित