पुणे | राज्यात नागरिकांनी सावध व्हायला हवं. कारण गेल्या तीन महिन्यात स्वाईन फ्लूमुळे तब्बल 302 जणांचा बळी गेला आहे.302 जणांचा बळी गेला असला तरी मागील वर्षाच्या तुलनेत आताचा आकडा कमी अाहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. या वर्षाच्या सुरवातीच्या काळात स्वाईन फ्लूचं प्रमाण कमी होतं. मात्र गेल्या 3 महिन्यात विषाणूंना पोषक वातावरण मिळालं आहे. त्यामुळे स्वाईन फ्लू झपाट्यानं वाढत आहे. दरम्यान, स्वाईन फ्लू टाळण्यासाठी त्याची लस उपलब्ध आहे. तापाची साथ सुरू झाली की तात्काळ ही लस टोचून घेणं आवश्यक आहे. या लसीमुळे स्वाईन फ्लूचा धोका 60 ते 70 टक्क्यांपर्यंत कमी होतो.
302 जणांचा बळी गेला असला तरी मागील वर्षाच्या तुलनेत आताचा आकडा कमी अाहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. या वर्षाच्या सुरवातीच्या काळात स्वाईन फ्लूचं प्रमाण कमी होतं. मात्र गेल्या 3 महिन्यात विषाणूंना पोषक वातावरण मिळालं आहे. त्यामुळे स्वाईन फ्लू झपाट्यानं वाढत आहे. दरम्यान, स्वाईन फ्लू टाळण्यासाठी त्याची लस उपलब्ध आहे. तापाची साथ सुरू झाली की तात्काळ ही लस टोचून घेणं आवश्यक आहे. या लसीमुळे स्वाईन फ्लूचा धोका 60 ते 70 टक्क्यांपर्यंत कमी होतो.