
किनवट,ता.२२(बातमीदार): धम्मरत्न पाटील, राहणार -समतानगर,किनवट यांच्या फिर्यादी वरून ता.५ नोव्हेंबर २०१५ रोजी आरोपी नामे अजय पाटील, मारोती पाटील व नंदा पाटील सर्व राहणार समतानगर,किनवट यांच्या विरुद्ध भादवि च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद करून किनवट न्यायलयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते.या प्रकरणात सरकार पक्षाने एकूण ७ साक्षीदार तपासले व न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून ता.१७/१०/२०१८ रोजी तिन्ही आरोपीना वरील गुन्ह्यातून न्यायमुर्ती जे.एन.जाधव यांनी निर्दोष मुक्त केले. आरोपी तर्फे येथील वकील तौफिक कुरेशी यांनी काम पाहिले.