
मुंबई, दि. 18 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील दहा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 57.22 टक्के मतदान झाले अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.
दहा लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वा. पर्यंत झालेले मतदान : बुलडाणा 57.09 टक्के, अकोला 54.45 टक्के, अमरावती 55.43 टक्के, हिंगोली 60.69 टक्के, नांदेड 60.88 टक्के, परभणी 58.50 टक्के, बीड 58.44 टक्के, उस्मानाबाद 57.04 टक्के, लातूर 57.94 टक्के आणि सोलापूर 51.98 टक्के