एसएमएस, व्हॉट्सऍपव्दारे मिळणार वीज खंडित झाल्याची सूचना

महावितरणने विद्युत नियामक आयोगाकडे सादर केलेल्या वीज दरवाढ प्रस्ताव क्रमांक १९५/२०१७ च्या निकालानुसार, राज्यात महावितरणला थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी डिजिटल मोडनुसार व्हॉट्स ऍप, एसएमएस, ई-मेलव्दारे नोटीस पाठविण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत डिजिटल नोटीस कायदेशीर ठरविण्यात आली आहे. महावितरणने मागील काही वर्षांपासून ग्राहकांच्या मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडीची नोंदणी केली आहे. त्याआधारे वीज ग्राहकांना वीजपुरवठा व विजेसंबंधी विविध बाबींची माहिती महावितरणतर्फे देण्यात येत आहे.

महावितरणने राज्यभरात २ कोटी ५ लाख तर नांदेड परिमंडळातील ६ लाख ९५ हजार ८९८ ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे. यामध्ये नांदेड जिल्हयातील ३ लाख ६७ हजार २४८ ग्राहकांचा तर परभणी जिल्हयातील १ लाख ८४ हजार ५४३ तसेच हिंगोली जिल्हयातील १ लाख ४४ हजार १०७ वीजग्राहकांचा समावेश आहे. या निर्णयामुळे थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडीत करणे अधिक सोयीचे झाले असून वीजग्राहकांना आता कुठलीही पळवाट राहिलेली नाही.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading