मुंबई | येणाऱ्या निवडणुकीत 2014 ची पुनरावृत्ती नाही तर त्यापेक्षाही जास्त जागा जिंकू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मोदी सरकारला 4 वर्षे पुर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी टाईम्स आॅफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.2019 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप सरकार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकही जिंकेल, असं त्यांनी सांगितलं.दरम्यान, शिवसेनेनं स्वबळाचा नारा दिला असला तरी आमची शिवसेनेबरोबर युती होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.